परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदी-चिनी भाई-भाई’, असे म्हणणारे काही जण पुढे चीनच्या आक्रमणात मृत्यू पावले, तर कुणास दु:ख का वाटावे ?’
‘हिंदी-चिनी भाई-भाई’, असे म्हणणारे काही जण पुढे चीनच्या आक्रमणात मृत्यू पावले, तर कुणास दु:ख का वाटावे ?’
‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’
‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे सुख केवळसाधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.’
लक्षात ठेवा, शस्त्रपूजनाद्वारे उपकरणांमध्ये शक्तीची प्रतिष्ठापना होते. अपराजितादेवीचे पूजन म्हणजे पराजय टाळणे आणि विजयप्राप्ती यांसाठी केलेली शक्तीची आराधना होय. सीमोल्लंघन म्हणजे प्रत्यक्ष विजयासाठी शत्रूच्या सीमेत प्रवेश करणे होय. विजयादशमीच्या कर्मकांडांचा हा अर्थ जाणून काळानुसार प्रत्येक कृती करा !