चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य पाहून राजकीय मंडळींनी केली नेत्यांची पाद्यपूजा !

‘आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करून मोक्षाचा मार्ग दाखवणारे’, असे गुरूंचे महत्त्व हिंदु धर्मात आहे. त्यामुळे शिक्षण, राजकारण यांसह विविध क्षेत्रांतील स्वत:च्या मार्गदर्शकांना गुरुस्थानी मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे.

शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

शिवसैनिकांच्या जिवाशी येत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथे दिली आहे. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी आक्रमण केले होते.

राज्यात पावसाचे ९९ बळी !

मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ सहस्र नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत अजूनही हवामान विभागाने दिलेली ‘रेड अलर्ट’ची चेतावणी तशीच आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी साधला युतीच्या खासदार आणि आमदार यांच्याशी संवाद !

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी १४ जुलै या दिवशी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे खासदार अन् आमदार यांच्याशी संवाद साधला. १८ जुलै या दिवशी होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुर्मू मुंबई येथे आल्या होत्या.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला द्यावयाच्या आरक्षणाविषयी सर्वाेच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीमुळे राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलैला !

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २० जुलै या दिवशी होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अतीवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटनांचे प्रमाण कायम !

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने घोषित केलेल्या अनुमानावरून राज्यातील काही ठिकाणी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कधीच अंगार विझणार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही’, गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील शब्दांत त्यांचे राजकीय गुरु बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत हिंदुत्वाचा अंगीकार केल्याचा पुनरुच्चार केला.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !

शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेच्या खासदारांनी ११ जुलै या दिवशी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती.