शिवसेनेच्या मूळ कार्यालयाची जागा शिंदे गटाकडे, तर ठाकरे गटासाठी नवीन कार्यालय !

सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरण भारताच्या कायदेतज्ञांकडे पाठवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हे प्रकरण केंद्रीय कायदेतंत्रांचा सल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपालाच्या कृतीवर आक्षेप घेणारे अशोक चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फटकारले !

राज्यपालांच्या हेतूविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करता येत नाही. ‘मुख्यमंत्रीपद भूषवले असतांनाही याविषयी माहिती कशी नाही ?’, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अशोक चव्हाण यांना फटकारले.

विधीमंडळ परिसरात प्रथमच शाईपेनच्या वापरावर बंदी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईने आक्रमण झाल्यानंतर राज्यभरात नेत्यांच्या बंदोबस्ताच्या वेळी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

नक्षलवाद्यांच्या धमकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याच्या धारिकेवर उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली नाही ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आत्राम यांना सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी केली. त्यावर शंभूराज देसाई ही माहिती दिली.

आमदार सौ. सरोज अहिरे-वाघ स्वतःच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला उपस्थित !

बाळ माझ्याविना राहू शकत नाही; मात्र माझे कुटुंबीय माझ्यासमवेत आले असून ते बाळाची काळजी घेतील, तेव्हा मी मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडणार आहे; कारण हे प्रश्नही महत्त्वाचे असल्याने मला बाळाला घेऊन यावे लागले.

मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक संघटितपणे लढा देणार !

सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बोगस ट्वीटच्या मागे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सीमावादाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी मराठी भाषिकांच्या मागे एकत्रित उभे रहायला हवे. सीमाप्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी अन्यही सूत्रे आहेत’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘खोके सरकार, ओके सरकार’च्या विरोधकांच्या घोषणा !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर विरोधकांनी कर्नाटक, तसेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हातात फलक धरून निषेधाच्या घोषणा दिल्या.

जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदना संपली असून ‘ईडी’ सरकारमध्ये असलेला विसंवाद प्रतिदिन दिसतो. राज्याप्रती मुख्यमंत्र्यांची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात आला आहे..