Mirza Fakhrul Islam Alamgir : (म्हणे) ‘सीमेवर सीमा सुरक्षा दल बांगलादेशी लोकांची हत्या करतो !’ – मिर्झा इस्लाम आलमगीर, ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’
भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी बांगलादेशी लोकांची हत्या केली असती, तर भारतात ५ कोटी मुसलमान बांगलादेशी घुसखोर राहू शकले असते का ? अशा भारतद्वेष्ट्यांचा भरणा असलेला पक्ष जर बांगलादेशात सत्तेवर आला, तर भारताला ती मोठी डोकेदुखीच होणार, हेच अशा वक्तव्यांवरून लक्षात येते !