विकासकामांना गती देण्याची आवश्यकता ! – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासकामांना गती देण्याची आवश्यकता ! – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अभय योजनेद्वारे महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. ही योजना इतर महापालिकांनी राबवावी. तसेच पुण्यात डिसेंबरपर्यंत आणखी ५०० बसगाड्या धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भारतरत्नांची चौकशी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?  – फडणवीस

भारतरत्नांची चौकशी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?  – फडणवीस

शेतकर्‍यांच्या आंदोलनावर विदेशातील वलयांकित व्यक्तींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वलयांकित व्यक्तींनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले आहे.

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.

मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या धारिका गुप्त असतात. असे असतांनाही हा प्रकार घडणे धक्कादायक आहे.

येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा

येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा

केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत.

मेट्रो कारशेडविषयी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस

मेट्रो कारशेडविषयी अधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल.

भाजप कार्यकर्ता हीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षितता ! – खासदार गिरीश बापट

भाजप कार्यकर्ता हीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षितता ! – खासदार गिरीश बापट

राज्य सरकारने आकसाने सुरक्षा व्यवस्था पालटली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य सरकारच्या खास सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नाही.

राज्यशासनाच्या कारभाराला कंटाळूनच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाकडे प्रतिनियुक्ती स्वीकारली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यशासनाच्या कारभाराला कंटाळूनच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाकडे प्रतिनियुक्ती स्वीकारली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस