
सांगली – अधिकारी, आमदार यांच्या ‘फोन टॅपिंग’मध्ये सहभागी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी उद्योजक अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांची हत्या या विषयांना विरोधक बगल देत असून ते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही या वेळी केला. जयंत पाटील म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी अधिकार्यांमधील संभाषणाचे ध्वनीमुद्रण मिळवले आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. गुप्तवार्ता विभागाच्या रश्मी शुक्ला यांनी कुणाच्या अनुमतीने अशा प्रकारे ‘फोन टॅपिंग’ केले. पोलिसांचे अनेक विभाग भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच वागत होते, हे आता उघड होत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे सारे उघड होईल. अनेक आमदार आणि अधिकारी यांचे असे टॅपिंग केले असण्याची शक्यता आहे.’’
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन