सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता त्यावेळी त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती.

सनातन संस्‍थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍था ही आध्‍यात्‍मिक संस्‍था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण साध्‍य करणारे आहेत. सनातन संस्‍थेची २५ वर्षे, म्‍हणजे समाजाच्‍या आध्‍यात्‍मिक सेवेची २५ वर्षे आहेत.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.

Global Spirituality Mahotsav : मनो-आध्‍यात्‍मिक उपचारांद्वारे स्‍वास्‍थ्‍य प्राप्‍ती शक्‍य ! – चेतन राजहंस, सनातन संस्‍था

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे चालू असलेला ‘जागतिक अध्‍यात्‍म महोत्‍सव’ !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे.

भारतात धर्म न शिकल्याने होणारे दुष्परिणाम !

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्तिकतावादी बनलेली असतात.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि गुरुकृपेने आलेल्या अनुभूती !

कार्यक्रमात माझ्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत होत असल्याने ‘गुरुकृपेने विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्या माध्यमातून योग्य उत्तरे दिली जातात’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेत आहे.’

चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

श्रीराममंदिराची उभारणी झाली असली, तरी ते अंतिम साध्य ठरू नये. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा ५०० वर्षांनंतर या देशात होत असेल, तर आता देशात रामराज्याचीही स्थापना होणे आवश्यक आहे,