६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वराची आध्‍यात्मिक पातळी जर १०० टक्‍के मानली आणि निर्जीव वस्‍तूंची ० टक्‍के मानली, तर सर्वसाधारण मनुष्‍याची आध्‍यात्मिक पातळी २० टक्‍के असते. या पातळीची व्‍यक्‍ती केवळ स्‍वतःच्‍या सुख-दुःखाचा विचार करते. समाजाशी तिचे काही देणे-घेणे नसते आणि ‘मीच सर्व करते’, असा तिचा विचार असतो. आध्‍यात्मिक पातळी ३० टक्‍के होते, तेव्‍हा ती ईश्‍वराचे अस्‍तित्‍व थोड्या प्रमाणात मान्‍य करू लागते, तसेच साधना आणि सेवा करू लागते. मायेची आणि ईश्‍वरप्राप्‍तीची ओढ सारखीच झाली की, व्‍यक्‍तीची आध्‍यात्मिक पातळी ५० टक्‍के होते. आध्‍यात्मिक पातळी जेव्‍हा ६० टक्‍के होते, तेव्‍हा ती व्‍यक्‍ती मायेपासून अलिप्‍त होऊ लागते. तिच्‍या मनोलयाला आरंभ होतो आणि विश्‍वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्‍यूनंतर ती जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून सुटून तिला महर्लोकात स्‍थान प्राप्‍त होते.

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले