महाराष्ट्रातील लोकांनी स्वभाषाभिमान जोपासायला हवा !
मराठी लोकांमध्ये स्वभाषेविषयी प्रेम निर्माण न होणे, याचा दोष मूळ महाराष्ट्राकडेच जातो. महाराष्ट्रात केवळ जातीयतेचे विष भिनले; भाषेचा अभिमान वृद्धींगत केला गेला नाही. महाराष्ट्रीय लोकांनी स्वभाषेचा अभिमान जोपासला नाही, ही अप्रिय; पण सत्य घटना आहे.