त्रिपुरा येथे रजा संमत होऊनही जाऊ न दिल्याने सैनिकाकडून वरिष्ठांची गोळ्या झाडून हत्या

येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार यांना गोळ्या घालून ठार केले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे ‘ओमिक्रॉन’ विषाणू बाधित ७ रुग्ण आढळले

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ या विषाणूने बाधित ७ रुग्ण पिंपरी चिंचवड, तसेच पुणे येथे आढळले आहेत. यात पिंपरी चिंचवड येथे नायजेरिया येथून आलेली महिला व फिनलँड येथून पुण्यात आलेल्या एका रुग्णाला बाधा झाली आहे.

सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषद उपसभापती

महिलांच्या सुरक्षिततेसमवेत महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.

कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य चालू ठेवूया ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवावर निर्बंधांचे सावट !

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव व्हावा, अशी सर्व शास्त्रीय संगीतप्रेमींची इच्छा आहे; मात्र राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार निर्बंधांचे बंधन आहे.

सुधागड (जिल्हा रायगड) येथे गुंगीचे इंजेक्शन देऊन ८ गोवंशियांची चोरी !

पोलिसांनी असा प्रकार करणार्‍यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे !

बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी निदर्शने करणारे ५ जण कह्यात

फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे.

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर (जिल्हा लातूर) येथे होणार !

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे, अशी घोषणा साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केली.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर एस्.टी. कर्मचारी संघटना आणि शासन यांनी समन्वयातून मार्ग काढावा ! – ग्राहक पंचायतीची मागणी

सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी.च्या  कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन चालू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेची असुविधा होत आहे.