एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर एस्.टी. कर्मचारी संघटना आणि शासन यांनी समन्वयातून मार्ग काढावा ! – ग्राहक पंचायतीची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

वैभववाडी – सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी.च्या  कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन चालू होऊन अनेक दिवस झाले. या संपामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्य जनतेची असुविधा होत आहे. त्यामुळे एस्.टी. कर्मचारी संघटना आणि शासन यांनी समन्वयातून यावर मार्ग काढावा अन् सर्वसामान्यांची होणारी असुविधा दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत, कोकण विभागाची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे.