धन्य धन्य ते पावन क्षेत्र ‘राममंदिर बांदा’ ।

प.पू. दास महाराज यांच्या दिव्य शरिराकडे पाहिल्यावर त्यांच्या संकल्पशक्तीमुळे मला पुढील काव्यपंक्ती उत्स्फूर्तपणे स्फुरल्या. त्या काव्यपंक्ती ईश्‍वरानेच माझ्याकडून लिहून घेतल्या.

पोलीस कर्मचार्‍याने बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याने विवाहित महिलेची आत्महत्या !

महिलांनो कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे सबल बना ! यासाठी साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. आत्महत्या करण्यापेक्षा अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी रणरागिनी बनून उभे रहा !

(म्हणे) ‘श्रीराम मंदिराचा निधी बळजोरीने घेतात !’ – आमदार नाना पटोले

विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ‘श्रीराम मंदिराच्या निधीविषयी बोलतांना मंदिरासाठी समाजातून बळजोरीने निधी गोळा केला जात आहे’, अशी मुक्ताफळे सभागृहात उधळली.

चीनचा शिनजियांगमधील उघूर मुसलमानांना नोकरीनिमित्त दुसर्‍या प्रांतात पाठवण्याचा प्रयत्न !

यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विदेशी संस्थांकडून होणारी भारताची अपकीर्ती जाणा !

अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये भारतात नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि स्वातंत्र्य हे वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

साधकांवर प्रीती करणारे आणि ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्नरत असणारे प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक !

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अनंत कृपेमुळेच मला अनेक संतांचा सहवास लाभला. मला वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या या प्रीतीसाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र आणि त्यांचे ध्यानावस्थेतील हसरे छायाचित्र यांच्या प्रयोगांच्या वेळी आलेल्या अनुभूती

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ यांना प.पू. दास महाराज करत असलेल्या ध्यानाच्या वेळी आलेल्या अनुभूती देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे मुंबई येथील सेवाकेंद्रात दर्शन घेतांना साधकांना आलेल्या विविध अनुभूती

‘गुरुपादुकांमधून धर्मकार्यासाठी शक्तीचा स्रोत प्रक्षेपित होत आहे. माझ्या भ्रूमध्यातून शक्ती संपूर्ण देहात शिरून सर्व पेशीपेशींत जात आहे आणि त्रासदायक शक्तीचे विघटन होत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला विशिष्ट गंध अनुभवायला आला….

‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, या स्वभावदोषावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा गिरिधर पाटील यांनी चिंतन करून केलेले प्रयत्न !

‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, हा स्वभावदोष दूर होण्यासाठी काय प्रयत्न केले ?’, या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी अंकगणित, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र, विमानउड्डाणाचे शास्त्र, नौकानयनशास्त्र इत्यादींच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक उपकरणांविना मूलगामी शोध लावले . . . यासाठीच बहुतांशी वैज्ञानिक संशोधनांचे खरे जनक भारतीय ऋषीमुनीच आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले