इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही ! – हर्षल सुर्वे, शिवदुर्ग संवर्धन आंदोलन

इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट सामने खेळू देणार नाही, अशी चेतावणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली

सातारा तहसील आणि प्रांत कार्यालय यांसाठी नवीन इमारत प्रस्ताव संमत करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्या ! – उदयनराजे भोसले

तहसील आणि प्रांत कार्यालय यांसाठी नवीन इमारत उभारणी आवश्यक आहे. त्याविषयी शासनाकडे दिलेला प्रस्ताव तात्काळ संमत करण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

विनाकारण वाहने अडवणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल ! – तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतलेला निर्णय योग्य असून असा निर्णय अन्य पोलीस अधिकार्‍यांनीही घ्यावा.

‘सारथी’ बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच उत्तरदायी ! – नरेंद्र पाटील

पाटण (जिल्हा सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळकोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. तेव्हा ते बोलत होते.

‘धर्मनिरपेक्षते’चे ढोंग !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचा लाळघोटेपणा म्हणा अथवा लांगूलचालन म्हणा, या सर्वांचे दुसरे नाव म्हणजेच ‘राष्ट्रीय काँग्रेस’ होय. काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १३५ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आरंभीची काही वर्षे सोडली, तर काँग्रेसचा हाच एककलमी कार्यक्रम राहिलेला आहे

श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !

श्रीराममंदिराचे बांधकाम चालू आहे. येथे आता ७० नाही, तर १०७ एकरमध्ये हे मंदिर आणि त्याचा परिसर असणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्र्स्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’ने सखोल अन्वेषण करावे !

देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यभर निवेदन देण्यात आले.

सनदी अधिकार्‍यांसह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६ कोटी ७३ लाख ५५ सहस्र ९४६ रुपयांचा घोटाळा

कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर चक्कर येऊन भिवंडी येथे एकाचा मृत्यू

कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुखदेव किर्दत (वय ४१ वर्षे) यांचा २ मार्च या दिवशी मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले.

हिंदूंना सुरक्षितता आणि संरक्षककवच देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल ! – मंगलप्रभात लोढा, आमदार

मुसलमानांच्या सततच्या त्रासामुळे मालवणी (मुंबई) येथील हिंदूंची संख्या अल्प झाली ! महाराष्ट्रातील मौलवी, फादर यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत आहे का ? केवळ हिंदूंना लक्ष्य केले जाते. सध्याचे सरकार हिंदूंच्या समर्थनाने निवडून आले आहे.