श्रीलंकेकडून पुन्हा एकदा चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला बंदरावर थांबवण्याची अनुमती !

आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्यासाठी चीनने नाही, तर भारताने साहाय्य केले होते. त्यानंतर श्रीलंका पुन्हा उभा रहात आहे; मात्र याची परतफेड श्रीलंका जर अशा प्रकारे करत असेल, तर भारताने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे !

कॅनडाकडून भारतावर हत्येचा आरोप करत उच्चाधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश !

कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.

युक्रेनी नागरिकांकडून हिंदूंचा योगाभ्यास आणि ध्यानधारणा !

एकीकडे पाश्‍चात्त्य जग हिंदु धर्माच्या अद्वितीय शिकवणीपुढे नतमस्तक होऊन ती अंगीकारल्याने स्वत:च्या जीवनात शांतता अन् आनंद अनुभवतात, तर दुसरीकडे भारतातील हिंदू त्याकडे पाठ फिरवून पुरोगामीपणाचा टेंभा मिरवत फिरतात !

वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत.

(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !

संयुक्त अरब अमिरातने भारताच्या मानचित्रात (नकाशात) पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्याने पाकचा थयथयाट !

संयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ?

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या शिक्षेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास लाहोर उच्च न्यायालयाचा नकार  

लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ बंद !

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ १७ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला. हा क्लब भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होता. या ठिकाणी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह क्रांतीकारकही राहिले होते.

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !