(म्हणे) ‘कॅनडाच्या दाव्यात तथ्य !’
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सयरुस काझी यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावरून विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या दाव्यात निश्चित काही तरी तथ्य आहे.’’ या वेळी त्यांनी ‘भारताचे कुलभूषण जाधव पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या कामामध्ये होते’ असा आरोपही केला.