(म्‍हणे) ‘कॅनडाच्‍या दाव्‍यात तथ्‍य !’

पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र सचिव सयरुस काझी यांनी भारत आणि कॅनडा यांच्‍यातील वादावरून विधान केले आहे. ते म्‍हणाले, ‘‘कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी केलेल्‍या दाव्‍यात निश्‍चित काही तरी तथ्‍य आहे.’’ या वेळी त्‍यांनी ‘भारताचे कुलभूषण जाधव पाकिस्‍तानला अस्‍थिर करण्‍याच्‍या कामामध्‍ये होते’ असा आरोपही केला.

हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या सूत्राविषयी भारताशी चर्चा ! – ऑस्‍ट्रेलिया

कॅनडातील हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणाची अजूनही चौकशी चालू आहे; परंतु त्‍यासंबंधीचे अहवाल चिंताजनक आहेत. आम्‍ही आमच्‍या भागीदारांसह या समस्‍येचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. याखेरीज आम्‍ही या सूत्रावर भारताशीही बोललो आहोत, अशी प्रतिक्रिया ऑस्‍ट्रेलियाचे परराष्‍ट्रमंत्री पेनी वांग यांनी व्‍यक्‍त केली आहे.

(म्‍हणे) ‘कॅनडातील हिंदूंनी त्‍वरित देश सोडून निघून जावे !’

बंदी घालण्‍यात आलेली खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्‍या हिंदूंना त्‍वरित कॅनडा सोडून जाण्‍याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू याने एक व्‍हिडिओ प्रसारित करून ही धमकी दिली आहे.

(म्हणे) ‘भारत हा एक दुष्ट हिंदुत्ववादी आतंकवादी देश बनला असल्याचे स्वीकारा !’-बिलावल भुट्टो

भुट्टो यांनी त्यांच्या देशाच्या उरल्यासुरल्या अब्रूच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! ही साधी गोष्टही न कळण्यासारखी व्यक्ती त्या देशाची एकेकाळी परराष्ट्रमंत्री होती, यातच सर्वकाही आले !

जस्टिन ट्रुडो यांची कृती वेडगळपणाची असल्याने अमेरिकेने त्यांच्या बाजूने उभे राहू नये ! – अमेरिकेतील अभ्यासक

भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या वेळी म्हटले की, जस्टिन ट्रुडो अशा लोकांच्या सल्ल्याने हे सर्व करत आहेत, ज्यांना खलिस्तानी चळवळ ही त्यांच्या लाभाची वाटते.

कॅनडामध्ये वर्षभरात भारतविरोधी १५ घटना घडूनही एकालाही अटक नाही !

यातून ट्रुडो सरकारची कार्यक्षमता आणि भारतद्वेष लक्षात येतो ! असे सरकार भारतावर आरोप करून जगात हास्यास्पदच ठरत आहे !

(म्हणे) ‘आतंकवाद आणि अपहरण यांच्या धोक्यामुळे जम्मू-काश्मीर, मणीपूर आणि आसाम येथे जाऊ नका !’

कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !

लिबियामध्‍ये ४० सहस्र लोकांच्‍या मृत्‍यूची शक्‍यता !

लिबियामध्‍ये झालेल्‍या मुसळधार पावसामुळे डर्ना शहरातील २ धरणे फुटून आलेल्‍या पुरामुळे आतापर्यंत ११ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे

करीमा बलूच यांच्या हत्येच्या वेळी ट्रुडो यांनी मौन बाळगले होते ! – निवृत्त कॅप्टन अनिल गौर

करीमा बलूच यांच्या हत्येच्या प्रकरणातकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मौन बाळगले होते. आता ट्रुडो खलिस्तान्यांना समर्थन देऊन स्वतःची सत्ता वाचवू पहात आहेत- निवृत्त कॅप्टन अनिल गौर

युक्रेन-रशिया युद्धात गुप्तपणे शस्त्रे पुरवल्याने पाकला मिळाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्यता निधी !

‘रशियाशी लढण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे शस्त्रे पुरवली होती. युद्धाच्या काळात युक्रेनच्या सैन्याने त्यांचा वापर केला यातून रशिया – युक्रेन युद्धात पाकिस्तानचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते.