कोरोना महामारीच्या संकटामुळे केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराकडून सरकारला ११ कोटी ७० लाख रुपये देण्यास असमर्थता !

संपूर्ण देशातील सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण होऊन मंदिरांचा पैसा सरकारी योजनांसाठी खर्च केला जात असतांना जर सरकारचा थोडासा पैसा हिंदूंच्या मंदिरांवर खर्च झाला, तर तो हिंदूंनी सरकारला का परत करावा, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतो !

जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल ! – गृहमंत्री अमित शहा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले. विधेयकावरील चर्चेवेळी विरोधी पक्षांनी यावर काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना शहा यांनी वरील घोषणा केली.

(म्हणे) ‘साधूंवर मुळीच विश्‍वास ठेवू नका, त्यांच्यासारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा काँग्रेसचे नेते

क्षाचे मिंधे असलेल्या वडेट्टीवार यांच्या डोळ्यांवर पट्टी असली, तरी पात्र कोण आणि अपात्र कोण, हे जनतेला ठाऊक आहे ! हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनीच देशातून हद्दपार करायला हवे !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे दिलेल्या निवेदनांना सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.

ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारणार्‍या दलिताला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही ! – केंद्र सरकार

‘आरक्षणाचा लाभ केवळ १० वर्षे देण्यात यावा’, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. आरक्षणाविषयी त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास देशाचा नक्कीच उत्कर्ष होईल !

चीन अतिशय खुश आहे !

‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे.-डॉ. स्वामी

टि्वटरच्या माध्यमातून गृहयुद्ध करण्याचा कट ! – कंगना राणावत

कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

होळकरांच्या सात-बार्‍यावर पवार कुटुंबियांचा डोळा ! – भूषणसिंह होळकर

होळकर पुढे म्हणाले, ‘‘अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण चालू आहे. पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांच्या हस्ते होऊ नये.

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथे पोलिसांना निवेदन !

पुणे येथे ३१ जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी या धर्मांधाने ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, असे धर्मद्रोही वक्तव्य करत हिंदु समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला आहे.

जेजुरी येथे पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण !

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी या दिवशी पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.