चर्चच्या वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेमध्ये बलात्काराचा आरोप असणारे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांचे छायाचित्र !

हिंदूंच्या निरपराध संतांवर टीका करणार्‍या पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना हे चालते का ?

(म्हणे) ‘तक्षशिला विश्‍वविद्यालय प्राचीन पाकिस्तानचा भाग !’

खोटेपणाचा कहर ! जर तक्षशिला ‘प्राचीन पाकिस्तान’ असेल, तर पाकने हे मान्य करावे की, त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि ते बाटलेले मुसलमान आहेत ! त्यांचा इतिहास इतका महान आहे, तर त्यांनी महान हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करावा !

केंद्राचे नवीन कृषी कायदे रहित न करण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ

विधान परिषदेत विरोधकांनी विरोध करून सभागृहात गदारोळ केला.

२ दिवसांच्या अधिवेशनातील पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव

सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !

शेतकर्‍यांचे प्रश्‍न आणि आरक्षण यांच्या प्रश्‍नांवरून विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन

मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्‍न, अतीवृष्टीमुळे झालेली शेतीची हानी, शेतीचे अन्य प्रश्‍न आदींवरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असा फलक परिधान केलेल्या आमदार रवि राणा यांच्या प्रवेशामुळे विधानसभेत गदारोळ

अपक्ष आमदार रवि राणा यांनी ‘शेतकर्‍यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण ! उद्धवा, अजब तुझे सरकार’, या लिखाणाचा फलक परिधान करून प्रवेश केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला.

आघाडी सरकारला फार काळ दबावाचे राजकारण करता येणार नाही ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मोगलाईचे राज्य चालू आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर खटले प्रविष्ट करण्यात आले. अधिवेशन चालू असतांना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी येथे येणार्‍या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून अभिनेत्री कंगना रणावत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडीमुळे चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रणावत यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहाच्या बाहेर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला.

वाढवण बंदराच्या विरोधात १५ डिसेंबरला किनारपट्टीवर बंद

आशिया खंडातील सर्वांत मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर मुंबई येथे विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे बंदर झाल्यास मच्छिमारांसह १० लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची रणनीती राज्य सरकारने ठरवावी ! – विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम सेना

२५ जानेवारी २०२१ पासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची नियमित सुनावणी चालू होत असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची रणनीती राज्य सरकारने ठरवावी, असे मत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारी विश्रामगृहावर माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.