
मुंबई – अपक्ष आमदार रवि राणा यांनी ‘शेतकर्यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण ! उद्धवा, अजब तुझे सरकार’, या लिखाणाचा फलक परिधान करून प्रवेश केल्यामुळे विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवि राणा यांना कडक शब्दांत समज दिली. या वेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवि राणा यांनी केलेली कृती अयोग्य असून त्यांच्या भावना शासनाने समजून घ्याव्यात’, असे वक्तव्य करून राणा यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर सभागृहातील गोंधळ थांबला.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !