देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचल्याचे प्रकरण

मुंबई – बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असणे आणि सरकार उलथवून टाकण्याचा कट रचणे या आरोपांवरून वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने ११ जून या दिवशी जामीन नाकारला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि श्याम चंडक यांच्या खंडपिठाने नमूद केले की, आरोपींनी वर्ष २०४७ पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला. रझी अहमद खान, उनैस उमर खय्याम पटेल आणि कय्युम अब्दुल शेख अशी त्यांची नावे आहेत. खंडपिठाने म्हटले की, आरोपींनी राष्ट्राचे हित आणि अखंडता यांना बाधक कारवाया केल्या आहेत, याचे पुरावे आहेत.
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी