‘१७.५.२०१९ या दिवशी सकाळी ८ वाजता मी एका साधिकेने दिलेला अल्पाहाराचा डबा पोचवण्यासाठी अमरावती सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा पू. पात्रीकरकाका अंघोळीला गेले होते. ‘त्यांना भेटून जावे’; म्हणून मी ध्यानमंदिरात नामजप करत बसलो. पू. पात्रीकरकाका आल्यावर मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला अल्पाहार आणला आहे. तो ग्रहण करावा.’’ तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘मी पूजा केल्यानंतर अल्पाहार करतो.’’ नंतर मी थोडा वेळ सेवाकेंद्रात थांबलो. तेव्हा दारातून मला चंदनाचा सुगंध आला. मी सेवाकेंद्राच्या फाटकाबाहेर जाईपर्यंत मला हा सुगंध येत होता.’
– श्री. रामदास चव्हाण, अमरावती (२७.५.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !