पहाटे ४.३० पासून लस घेण्यासाठी नागरिक रांगेत !
प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

कोल्हापूर, २७ एप्रिल – पंचगंगा रुग्णालय लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला यांचा समावेश होता. (प्रारंभीपासून प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करून पुरेसी लस उपलब्ध करून दिली असती, तर नागरिकांना लस घेण्यासाठी पहाटे ४.३० पासून रांगा लावण्याची वेळ आली नसती. किमान यापुढील काळात तरी प्रशासनाने नागरिकांना इतक्या पहाटे यावे लागू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात ! – संपादक)
इतक्या पहाटे आल्याने अनेक नागरिकांनी अल्पाहारही केला नव्हता. याची नोंद घेत संयुक्त उत्तरेश्वर शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने श्री. किशोर घाटगे, श्री. संजय देसाई, श्री. सुरेश कदम आणि त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेत या नागरिकांना पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे देऊन त्यांना आधार दिला. या वेळी गर्दी टाळण्यासाठी शिवसैनिकांनी योग्य प्रकारे रांगा लावणे, ज्येष्ठांना आधार देणे यांसारख्याही कृती केल्या.
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयाच्या दारातच रात्रभर झोपून केले अनोखे आंदोलन !