
कणकवली – शासनाने शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस पूर्णत: दळणवळण बंदी घोषित केली होती. त्याला सिंधुदुर्गवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला; मात्र सोमवार, १२ एप्रिल या दिवशी पुन्हा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा चालू झाल्याने नागरिकांची गर्दी दिसली.
शासनाने शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पूर्णत: दळणवळण बंदी घोषित करून सोमवार ते शुक्रवार हे दिवस अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास अनुमती दिली होती; मात्र शासनाच्या या निर्णयाला व्यापार्यांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर सोमवार, १२ एप्रिलपासून सर्व प्रकारचे व्यवसाय चालू रहातील, अशी भूमिका व्यापारी संघाने घेतली. त्यानुसार जिल्ह्यात आगामी काळात पुन्हा दळणवळण बंदी घोषित होण्याच्या शक्यतेने जनतेने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !