पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विवाह समारंभासाठी ५० वर्हाडींची मर्यादा कायम !

पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विवाह समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे. तसेच समारंभासाठी येणार्या ५० लोकांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे; मात्र लसीकरण झाले नसल्यास समारंभाला उपस्थित रहाणार्यांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित प्रत्येक व्यक्तीला १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे.

यासह मंगल कार्यालयातील सर्व कर्मचार्यांचे लसीकरण केलेले असणे किंवा त्यांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा दाखला कर्मचार्यांनी समवेत बाळगावा. याचे उल्लंघन झाल्यास प्रत्येक व्यक्तीला १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार असून मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाकडून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांना १० सहस्र रुपयांचा दंड करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. मंगल कार्यालयांकडून नियमांचा वारंवार भंग झाल्यास त्यांचा परवाना रहित करण्याचीही कारवाई होणार आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)