
मुंबई – दळणवळण बंदी राज्यशासन आणि तुम्हा-आम्हाला कुणालाच नको आहे; पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा अल्प करायचा असेल, तर नियम पाळायलाच हवेत. दायित्वशून्य नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी २ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘आपण याआधीही रुग्णसंख्या शून्य करून दाखवली आहे. जगात दुसरी लाट तीव्रतेने आलेली दिसत आहे. लोकांनी घाबरू नये; पण स्वत:ला सांभाळा आणि नियम पाळा. दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत; मात्र त्याचा अर्थ ‘कसेही वागा आणि रुग्णसंख्या वाढावा’, असा होत नाही. शेवटी कोणताही निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा, संरक्षणार्थ असणार आहे. उगाच घ्यायचा म्हणून निर्णय घेणार नाही. कोरोनावर राजकारण चालू असून जनतेला उकसवले जात आहे. या आधीच्या दळणवळण बंदीमध्ये जनतेने चांगली साथ दिली. मागील १ वर्षात अनेकांना मोठा धक्का बसला आहे, पण शेवटी वाचलो, तरच लढू शकतो. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही निर्णय घेत आहेत. त्यावर राजकारण होता कामा नये.’’
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)