
रत्नागिरी – जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगलीहून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी रत्नागिरीत आले; मात्र रत्नागिरीकरांनी त्यांना भाजी विक्री करण्यापासून रोखले. ‘सांगली जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथून येणार्या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो’, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने रत्नागिरीकरांनी सांगलीच्या भाजी व्यापार्यांना रोखले.
रत्नागिरीला भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तू घाटमाथ्यावरून (कोल्हापूर, सांगली येथून) येतात. त्यामुळे रत्नागिरीकरांनी भाजी व्यापार्यांना विरोध केला, तरी त्याचा मोठा परिणाम अंतिमतः त्यांच्यावरच होऊ शकतो. त्यामुळे याविषयी प्रशासन काय भूमिका घेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !