वारकर्यांवर लाठीमार प्रकरणी कुणीही राजकारण करू नये ! – आळंदी देवस्थान
आनंदाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. १२ जूनला घडलेल्या घटनेत आळंदी देवस्थानाचा संबंध नव्हता. हा प्रकार अपसमजातून झाला आहे. एकूण ४७ दिंड्या आहेत, त्यामधील ७५ वारकर्यांना ‘पास’ दिले होते. वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनाही देवस्थानचे पास दिले होते; मात्र अधिक संख्या असल्याने त्यांनी हट्ट केला. मुले वारकरी म्हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत होते.