वारकर्‍यांवर लाठीमार प्रकरणी कुणीही राजकारण करू नये ! – आळंदी देवस्‍थान

आनंदाच्‍या सोहळ्‍याला गालबोट लागले आहे. १२ जूनला घडलेल्‍या घटनेत आळंदी देवस्‍थानाचा संबंध नव्‍हता. हा प्रकार अपसमजातून झाला आहे. एकूण ४७ दिंड्या आहेत, त्‍यामधील ७५ वारकर्‍यांना ‘पास’ दिले होते. वारकरी शिक्षण संस्‍थेतील मुलांनाही देवस्‍थानचे पास दिले होते; मात्र अधिक संख्‍या असल्‍याने त्‍यांनी हट्ट केला. मुले वारकरी म्‍हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी पोलीस काम करत होते.

लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !

पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.

पुणे येथे कुलुपबंद शाळेमुळे वारकर्‍यांच्या मुक्कामाचे हाल !

कुलुपबंद शाळेमुळे अनेक वारकर्‍यांना स्वत:ची पथारी (बिछाना) सकाळी वाहनतळाच्या जागेत टाकावी लागली. ती जागा अपुरी असल्याने त्यांना मग शाळेकडे येणार्‍या रस्त्यावरच पथारी टाकून बसावे लागले आहे.

वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !

पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.

आळंदी येथील लाठीमार प्रकरणाची दुसरी बाजू समोर !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखी सोहळ्‍याच्‍या प्रस्‍थानापूर्वी वारकरी आणि पोलीस यांच्‍यामध्‍ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार केला. यानंतर याच प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणणारा व्‍हिडिओ समोर आला आहे.

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्‍या पालख्‍यांचे १४ जूनला पुण्‍यातून प्रस्‍थान !

संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी आणि जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज पालखी येथे १२ जूनपासून मुक्‍कामी आहेत. या पालख्‍यांचे प्रस्‍थान १४ जून या दिवशी होणार आहे.

हरिनामाच्‍या अखंड जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांच्‍या पालखीचे पंढरपूरच्‍या दिशेने प्रस्‍थान !

वारकर्‍यांच्‍या टाळ मृदुंगाच्‍या गजरात ११ जून या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान सोहळा पार पडला. इंद्रायणीच्‍या काठावर सहस्रों वारकरी आलेे होते.

वारीचे स्‍वरूप बदलले असले, तरी आजही त्‍याचा आत्‍मा कायम आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर

समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे ही त्‍या काळाची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे त्‍या वेळच्‍या संतांनी आपापले संप्रदाय बाजूला ठेवून सर्वांचा एकच देव म्‍हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्‍य केले आणि तेव्‍हापासून वारीला आरंभ झाला असे देगलूरकर यांनी सांगितले.

यंदाच्‍या वारीमध्‍ये ‘आनंदडोह’ हा एकपात्री नाट्यप्रयोग दाखवणार !

३३८ व्‍या पालखी सोहळ्‍यानिमित्त संवाद, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील राष्‍ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत वारीच्‍या मार्गावर अभिनेता योगेश सोमण यांच्‍या अभियानातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत.

संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा १२ जूनला पुण्‍यात मुक्‍काम !

इनामदार वाड्यातील मुक्‍कामानंतर ११ जूनला ही पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्‍कामासाठी विसावली होती. १२ जूनला पहाटे ५ वाजता पालखी पुणे मुक्‍कामी रवाना होईल. हा सोहळा पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठा आनंद सोहळा असतो.