रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.
‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.
गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला आणि माझे सकारात्मक चिंतन अधिक होऊ लागले.
‘रामनाथी आश्रम पाहून वाटले, ‘प्रत्येक मंदिर या आश्रमासारखे व्हावे.’ दर्शनार्थी आणि साधक यांना धर्मज्ञान देण्यासाठी हा आश्रम एक आदर्श आहे. साधकांचा आपलेपणा, समर्पण आणि मार्गदर्शन (Guidance) उल्लेखनीय आहे.’
‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.
‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्यावर मी प्रत्यक्ष अनुभवले.
‘आश्रमातील शांती अनुभवण्यासारखी असून ती शब्दांत सांगता येत नाही. येथे आलेल्या प्रत्येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्यानंतरही माझी ही अवस्था काही आठवडे नव्हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्हा येण्याची ओढ लागलेली असते….
‘आपण संगीताचा अत्यंत सूक्ष्म स्तरावर अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘संगीताचे मानवी मनावर होणारे परिणाम इतरांना समजावून सांगणे’, हे फार चांगले कार्य आहे.’
या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’
‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….