सातारा येथील कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त) (वय ७४ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 

१. जाणवलेले सूत्र

कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त)

 १ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी धर्मरक्षणासाठी अवतार घेतला आहे’, असे वाटणे : ‘भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे की, ‘ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल, त्या वेळी मी पुन्हा पृथ्वीवर अवतार घेईन.’ खरोखरच आज भारत देश आणि हिंदु धर्म यांच्यावर संकटे आली आहेत. यासाठीच श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अवतार घेतला आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यांमुळे हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांच्या स्थापनेसाठी संत, सद्गुरु आणि अनेक साधक हे सर्व जण प्राणपणाने साधना करत आहेत.

२. अनुभूती

२ अ. आश्रमातील चांगल्या स्पंदनांमुळे ‘शरीर फुलपाखरासारखे हलके झाले आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी आश्रम हा स्वर्ग आहे’, याची मला प्रत्येक क्षणाला अनुभूती येत होती. आश्रमातील प्रत्येक वस्तूमधून उच्च कोटीची चांगली स्पंदने येत होती. मी रामनाथी आश्रमामध्ये आल्यावर माझे शरीर म्हणजे ‘चालता बोलता मातीचा गोळा आहे’, असे मला वाटत होते आणि आश्रमातून परत जातांना ‘माझे शरीर फुलपाखरासारखे हलके झाले आहे’, असे मला जाणवले.

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त), सातारा (१६.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक