शेतीसाठी तातडीने अर्थसाहाय्य करणे आवश्यक ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने विविध क्षेत्रांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतीसाठी घोषित केलेले अर्थसाहाय्य पुरेसे नाही.

आठवडा बाजारासाठी सांगलीहून आलेल्या भाजी व्यापार्‍यांना रत्नागिरीतील नागरिकांनी रोखले !

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला राज्यशासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांगलीहून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी रत्नागिरीत आले; मात्र रत्नागिरीकरांनी त्यांना भाजी विक्री करण्यापासून रोखले. ‘सांगली जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढल्यामुळे तेथून येणार्‍या नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव

चिकित्सालये बंद ठेवून नागरिकांची असुविधा करणार्‍या डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे ! – मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि पालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे; मात्र झोपडपट्टी अन् वसाहती यांच्या परिसरात अनेक खासगी चिकित्सालयेे जाणीवपूर्वक बंद ठेवून नागरिकांची असुविधा केली जात आहे. अशा दायित्वशून्य डॉक्टरांचे अनुमतीपत्र रहित करावे

श्री सिद्धीविनायक देवस्थान राबवणार रक्तसंकलन अभियान

कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर न्यासाच्या वतीने रक्तसंकलन अभियान राबवण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर याविषयी म्हणाले की, मुंबईत रहाणार्‍या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी स्वत:चे नाव श्री सिद्धीविनायक मंदिरात सकाळी १० ते…

पोलीस असल्याचे सांगून नागरिकांना लुटणार्‍या तिघांना अटक

पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीचे उल्लंघन केल्याची भीती दाखवून करवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक आणि भाववाढ करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जीवनावश्यक वस्तूूच्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने चालू ठेवावीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल…

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष)…

बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक

बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते.

(म्हणे) ‘इस्टरचे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही !’ – आयरिश रॉड्रीग्स

सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

शासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात !

कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.