सांगलीत जुगार अड्ड्यावर धाड, माजी नगरसेवक आयुब पठाण यांच्यासह १३ जणांना अटक

अशा गुन्ह्यांमध्ये लगेच आणि कठोर शिक्षा होत नसल्याने असे गुन्हे करणार्‍यांना कायद्याचा कोणताही धाक वाटत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे.

‘पी.एफ्.आय.’वर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सातारा येथील राजवाडा बसस्थानकातील ‘शिव-समर्थ’ शिल्पाला छावा क्षात्रवीर सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांचा विरोध

शिव-समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतच काही संघटनांनी ‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते’, असा अपप्रचार चालू केला आहे. या संघटनांनी हे शिल्प हटवण्याचा पवित्रा घेतला असून याविषयीचे निवेदन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एस्.टी. महामंडळ प्रशासन यांना देण्यात आले आहे.

गौरीगद्दे (कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.

कृषी आणि पणन कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला राज्यातील सर्व बाजार समित्या बंद ! – अशोक डक

केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिली.

जनता वसाहतींमध्ये रहाणार्‍या कुटुंबाला ९८ सहस्र ७८० रुपयांचे वीजदेयक !

महावितरणच्या गोंधळामुळे त्यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या माहितीदर्शक फलकांवर व्याकरणाच्या अनेक चुका !

पाट्याटाकूपणे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करणे आवश्यक !

‘भारत बंद’चा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप यांचा पाठिंबा.
आंदोलनाला पाठिंबा म्हणजे शेतकर्‍यांना लुटणार्‍या दलालांना पाठिंबा !

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती

दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य !

राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.