कृषी आणि पणन कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला राज्यातील सर्व बाजार समित्या बंद ! – अशोक डक

नवी मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीही या बंदला पाठिंबा दिला.