गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक
श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’’
गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक
बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.
गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक
एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक
चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.
गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.
गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक
मायेतील ब्रह्माची जाणीव करून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य होय ! – संत भक्तराज महाराज