
वर्धा, १९ एप्रिल (वार्ता.) – बंगालच्या मुर्शिदाबाद येथे झालेला हिंसाचार आणि हिंदूंच्या हत्या यांच्या विरोधात १९ एप्रिल या दिवशी वर्धा येथे सर्व सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावे’, अशा मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सर्वश्री भाजपचे माजी खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, विश्व हिंदु परिषदेचे नेते अटल पांडे, शिवसेनेचे जिल्हा नेते तुषार देवढे, शिवसेनेचे उपजिल्हा नेते बालू कीर्तने यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जनआक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. वाहनफेरीच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाचा समारोप करण्यात आला.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव