वसई येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम
रत्नागिरी – १८ एप्रिल या दिवशी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिरसाड, वसई (नाणीजधामचे मुंबई पीठ) येथे घरवापसी (सनातन धर्मात पुनर्प्रवेश) या कार्यक्रमात ५०६ जणांनी सनातन धर्मात पुनर्प्रवेश केला. अन्य पंथांत प्रवेश करणार्या हिंदूंना परत हिंदु धर्मात घेण्याचे कार्य नाणीजधाम पिठाकडून गेली अनेक वर्षांपासून केले जात आहे. आतापर्यंत १ लाख ५१ सहस्र २७८ लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.
हिंदु धर्मबांधवांना षड्यंत्राद्वारे किंवा विविध आमिषे दाखवून त्यांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा गैरलाभ उठवत हिंदु धर्माविषयी अपप्रचार केला जात आहे. अनेक वेळा त्यांना धमकावून त्यांचे धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे आजवर सनातन धर्माची अपरिमित हानी झाली आहे. अशा धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा असते. अशांची घरवापसी करण्यासाठी नाणीजपिठाकडून महाअभियान जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जाते. असाच एक सोहळा १८ एप्रिलला शिरसाड (वसई) येथे झाला.
गोमाता पूजन, होम हवन आदी विधी या कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी सर्व बांधवांना जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी शपथ दिली. या कार्यक्रमासाठी पालघर खासदार डॉ. हेमंत विष्णु सावरा, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रमेश ओझे उपस्थित होते. या सोहळ्यात पालघर, नाशिक आणि गुजरातमधील धर्मांतरित कुटुंबांना विधिवत हिंदु धर्मात प्रवेश देण्यात आला.
धर्मगुरु या नात्याने ५०६ जणांना पुन्हा हिंदु धर्मात आणले ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज![]() १८ एप्रिल २०२५ या दिवशी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम यांचे उपपीठ वसई (मुंबई) आहे. या पिठावर हा कार्यक्रम होत आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, जे आमचे हिंदु बांधव ख्रिस्ती मशिनर्यांच्या भूलथापांना भूलून अन्य पंथांत जाऊन त्यांनी हिंदु धर्माचा त्याग केला होता. अशा हिंदु धर्मबांधवांना पुनश्च घरवापसी कार्यक्रमातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य धर्मगुरु या नात्याने मी त्यांना हिंदु धर्मात स्वीकारलेले आहे. आम्ही त्यांना दीक्षा दिली आहे. हिंदु धर्माची त्यांना उपासनापद्धत चालू करून दिली आहे. आम्ही हे कार्य अनेक वर्षांपासून करत आहोत. आतापर्यंत १ लाख ५१ सहस्र २७८ लोक हिंदु धर्मात आलेले आहे. वैदिक धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे आज ५०६ लोकाचे प्रायश्चित्त विधान करून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदु धर्माची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे. |