Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

Goa Unseasonal Rains : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या गोमंतकियांना पावसामुळे दिलासा

या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.

सलमान खान यांच्या घरी लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ‘कॅब’ पाठवणारा अटकेत !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याने कुणी कोणतेही कृत्य करायला धजावतो, हेच खरे !

उष्माघातामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे दिवसाला १०० प्राणी-पक्षी घायाळ !

उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ सहस्र ८५१ शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यांमधील व्यक्ती, तसेच अन्य यांच्याकडून राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी सर्व शस्त्रे जमा करून घेणे अत्यावश्यक आहे.

चैत्र एकादशीला पंढरपूर येथील दर्शनवारीत स्थानिक सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप !

केवळ मुखदर्शन आणि उन्हामुळे त्रस्त असलेल्या वारकर्‍यांना मंदिर समितीच्या गैरव्यवस्थापनाचा फटका बसत होता. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ लागत होता, काही सुरक्षारक्षक वारीत मध्येच लोकांना सोडत असल्याचा आरोप होत आहे.

‘हिल रायडर्स फाऊंडेशन’ आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांच्या वतीने जोतिबा मंदिर परिसरातील वास्तूंची स्वच्छता !

या स्वच्छतेत अवघड ठिकाणी उगवलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी गिर्यारोहणाच्या तंत्राचा वापर करण्यात आला. या स्वच्छतेत देवस्थान समिती, ग्रामपंचायत जोतिबा, जिल्हा प्रशासन, ‘समित ॲडव्हेंचर’ यांचे सहकार्य लाभले, तसेच ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांचे मार्गदर्शन लाभले.

पुणे येथील बी.जे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीवर ‘रॅगिंग’ न झाल्याचा अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा दावा

प्रारंभी ‘रॅगिंग’ प्रकरणी तक्रार आल्याचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी मान्य केले होते. २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर डॉ. काळे यांनी ‘रॅगिंग’ झाले नसल्याचे सांगितले आहे.

बोगस बियाणे खते आढळल्यास गुन्हे नोंदवा ! – जिल्हाधिकारी

बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठाणे शहरात भ्रमणभाषची चोरी करणारा धर्मांध अटकेत !

पहिल्याच चोरीच्या वेळी कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम होय !