‘घर घर तिथे शिवसेना सभासद नोंदणी’स गांधीनगर येथून प्रारंभ !

या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’’ 

लातूर येथील श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालयात लावण्यात आले क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन !

‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?

मत्तीवडे (जिल्हा कोल्हापूर) येथील गणेशोत्सव मंडळांचा ‘हिंदु राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे सर्वश्री शशांक सोनवणे आणि आदित्य शास्त्री यांनी आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी प्रबोधन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’, ही मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालये, इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय येथे याविषयीचे निवेदन देण्यात आले.

भारतमातेच्या पूजेला विरोध करणार्‍या संघटनांवर बंदी घाला !

मुसलमान संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कर्नाटकातील मंगळुरू विश्वविद्यालयात ११ ऑगस्ट या दिवशी होणारी भारतमातेची पूजा रहित करण्यात आली.

भारताची आत्मस्वरूप आणि विवेकपूर्ण वाणी असलेली संस्कृत भाषा !

१२.८.२०२२ (श्रावण पौर्णिमा) या दिवशी ‘विश्व संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्त ‘संस्कृत भाषेचे महत्त्व, संस्कृत भाषा मागे पडण्याची कारणे आणि आजच्या वैज्ञानिक युगात संस्कृत भाषा प्रचलित होण्याची आवश्यकता’, या विषयांचा ऊहापोह खालील लेखात केला आहे.

भारतियांनो, ‘संस्कृतची उपेक्षा करणे, हे एक संस्कृतीविरोधी आणि राष्ट्रविरोधी कृत्य आहे’, हे लक्षात घ्या अन् तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करा !

संस्कृत ही केवळ भाषाच नाही, तर संस्कृती जपणारा एक महान वारसा आहे. संस्कृतनेच भारताला विश्वगुरु बनवले आहे; म्हणूनच संस्कृतविना भारतातील शैक्षणिक विस्तार, नैतिक उत्थान आणि विविध देशांशी मधुर संबंध यांची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणजे मंकीपॉक्स नव्हे !

‘मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य काही शहरांतील लहान मुलांत ‘मंकीपॉक्स’सारखी लक्षणे दिसल्याने पालकांत भीती’, अशा शीर्षकाची बातमी काही ठिकाणी वाचण्यात येत आहेत. यासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे…