मत्तीवडे (जिल्हा कोल्हापूर) येथील गणेशोत्सव मंडळांचा ‘हिंदु राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार !

मत्तीवडे येथे गणेशोत्सव मंडळांना माहिती देतांना श्री. शशांक सोनवणे आणि श्री. आदित्य शास्त्री

मत्तीवडे (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे सर्वश्री शशांक सोनवणे आणि आदित्य शास्त्री यांनी आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘गणेशोत्सव काळात प्रवचने आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करणे, सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ यांचे वितरण करणे, तसेच हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध उपक्रम राबवणे’, यांविषयीचा निर्धार  केला. या बैठकीला अनेक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.