सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद
नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद
४ नोव्हेंबर आणि त्यानंतर प्रत्येक रविवारी दैवी बालकांची वैशिष्ट्ये सांगणारी नवीन लेखमाला…
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात नैतिकता, कर्तव्यनिष्ठा यांचा अभाव असण्याचे कारण म्हणजे त्यांना धर्मशिक्षण दिलेले नाही.
नामजप सत्संग : दीपावलीपूर्वी घराची स्वच्छता आणि सजावट करणे यांमागील धर्मशास्त्रीय आधार !
भावसत्संग : प्रभु श्रीरामाची कृपा संपादन केलेले संत !
धर्मसंवाद : दीपावली विशेष : फटाके उडवणे अयोग्य का ? (भाग २)
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
कर्नाटकात ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले असून तेथील देवनिधीचा उपयोग योग्य पद्धतीने केला जात नाही. हा ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ संतापजनक प्रकार आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियम सदोष आहेत.
मंदिरांमध्ये शासकीय अधिकार्यांची नियुक्ती केल्यामुळे तेथील भक्तीभाव लोप पावत चालला आहे. भक्तीमार्गाची शिकवण देण्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे आवश्यक आहे.
राज्यघटना सर्वाेच्च असल्याचे आज वारंवार सांगितले जाते. तिची शपथ घेऊन प्रत्येक खासदार, पोलीस आणि समाज तिच्या रक्षणाचा दावा करतात; मात्र प्रत्यक्षात याचे महत्त्व राहिले आहे का ? गेल्या वर्षी राज्यसभेच्या अध्यक्षांनी कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाच्या खासदारांनी केलेल्या रेल्वे तिकीट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.
कौटिल्याने स्वत:च्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली.