महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार : १८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये आणखी १८ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. ९ ऑगस्ट या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन सरकारमधील १८ आमदारांना मंत्रीपद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !

श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पंढरपूर येथे येऊन लाखो भाविकांनी पुत्रदा एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या चरणांवर भावपूर्ण माथा टेकला.

दौंड (पुणे) येथे ७०० किलो गोमांस जप्त, ३ धर्मांधांसह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शाळा-महाविद्यालय, पोलीस यांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले.

आज होणार मंत्रीमंडळाचा विस्तार !

महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ देणार आहेत.

तुमसर (जिल्हा भंडारा) येथे ढगफुटीसदृश पाऊस !

नागूपर येथे ८ ऑगस्ट या दिवशी बेसा रस्त्यावर भर पावसात एका शाळेची गाडी उलटली. त्यात १६ विद्यार्थी होते. यात ३ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागरिकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’, तर ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग असणार आहे

कारागृहातून जामीन मिळाल्यावर जल्लोषात मिरवणूक काढणार्‍या रियाझ शेखसह ६ जणांवर गुन्हा नोंद !

कारागृहातून बाहेर आल्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढणार्‍या सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !

कोल्हापुरात गेल्या २ दिवसांपासून संततधार : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३३ फूट २ इंच (धोक्याची पातळी ३९ फूट) झाली आहे. नदीवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ४ अपत्यांचे ‘टीईटी’ प्रमाणपत्र रहित !

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि शिंदे गटातील विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या ४ मुलांची नावे आली आहेत. ‘टीईटी’ परीक्षेच्या अपात्र सूचीत सत्तार यांच्या ४ मुलांची नावे आहेत.