
कोल्हापूर, ८ ऑगस्ट (वार्ता.) – गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३३ फूट २ इंच (धोक्याची पातळी ३९ फूट) झाली आहे. नदीवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली धरणात सध्या २९.७८ टी.एम्.सी. (८० टक्के धरण भरले) पाणीसाठा झाला असून धरणातून ३ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. राधानगरी धरण ८५ टक्के भरले असून तुळशी जलायशही ८२ टक्के भरले आहे. अलमट्टी धरण (कर्नाटक) ९५ टक्के भरले असून धरणातून ८ ऑगस्ट या दिवशी १ लाख घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !