पाकिस्तान आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे चालवत आहे ! – एस्. जयशंकर

आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

म्हादईची लढाई सर्वाेच्च न्यायालयात लढणार : गोवा मंत्रीमंडळ सज्ज !

म्हादई पाणी वाटपावरून संघटित न होता सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घालणारे विरोधी नेते कधी जनहित साधतील का ?

भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे पुण्यात कर्करोगाच्या आजारामुळे निधन !

पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तूपाठ होते. बरे होतील असे वाटतांनाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे.

‘देव संस्कृती विश्वविद्यालय (हरिद्वार)’चे कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली सदिच्छा भेट !

सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’

प्रतिकात्मक छायाचित्र

भिवंडी येथे ‘मेरी पाठशाळा’ आंदोलनात विद्यार्थ्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करायला हवा !

(म्हणे) ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान ! लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांचा उपहासगर्भ अभिप्राय ! हिंदुत्वनिष्ठ संतप्त.

‘एन्.आय.ए.’च्या न्यायालयात चालू असलेल्या मालेगाव बाँबस्फोटाच्या खटल्याला स्थगिती देणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही !

कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल

हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !

विधानसभेत संमत झालेले ‘लोकायुक्त’ विधेयक विधान परिषदेत प्रलंबित !

ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे हे गेली ११ वर्षे लोकायुक्त विधेयक आणण्यासाठी धडपड करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेत हे विधेयक एकमताने संमत केले; मात्र उद्धव ठाकरे गटाने हे विधेयक विधान परिषदेत प्रलंबित ठेवले आहे.

स्वराज्य आणि स्वधर्म यांसाठी बलीदान केलेल्या हिंदु छाव्याचे धर्मवीर पद नाकारणे, हा हिंदूंचा अपमान ! – हिंदु महासभा

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.