तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला अटक !

तृणमूल काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते बाँब बनवण्यापासून हत्या करण्यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे वेळोवळी सिद्ध झाले आहे. अशा पक्षावर बंदी घातली पाहिजे !

ज्ञानवापीच्या प्रकरणी आदेश देणार्‍या न्यायाधिशांना कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता

यावरून देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !

आजपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण होणार

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले , उद्या होणार्‍या सर्वेक्षणापूर्वी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मशिदीच्या सर्वेक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी

‘ब्राह्मोस’च्या साहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, अण्वस्त्र ठेवण्यात आलेले बंकर, आदेश आणि नियंत्रण केंद्र, समुद्रातील विमानवाहू नौका यांवर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास साहाय्य होणार आहे. यानंतर ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता ८०० कि.मी.पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !

उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात पोलीस शिपाई ठार

याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !

पुणे जिल्ह्यात हिंदूसंघटन करण्याचा हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि धर्मप्रेमी यांचा निश्चय !

यामध्ये अधिवक्ता, विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि वारकरी संप्रदाय यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्‍याला येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योजनाबद्ध कार्य करणे आवश्यक ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

धर्मसंस्थापनेसाठी साधना हा मूलमंत्र आहे. साधना केल्याने आपल्यावर ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व शक्य होते. हिंदु संस्कृतीचे पालन केले, तरच आपल्याला यश मिळेल.