सावंतवाडी (सिंधुदुर्ग) बसस्थानकाच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

बसस्थानकाची एवढी दुरवस्था झाल्याचे एस्.टी. महामंडळाला अन्य कुणीतरी का दाखवून द्यावे लागते ? महामंडळ काय करत आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथरोगांच्या पार्श्वभूमीवर १०३ गावे जोखीमग्रस्त

भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती

शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे  रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता ? हाच प्रश्न निर्माण होत आहे. त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुष्टीकरण करणार्‍या काँग्रेसला भाजपसमवेत घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

तुष्टीकरणाच्या नीतीमुळे भारताचे विभाजन झाले. तुष्टीकरणामुळे २ देशांचा सिद्धांत मांडला गेला; परंतु त्यानंतरही तुष्टीकरण थांबलेले नाही. तुष्टीकरणाला भाजपमध्ये स्थान नाही.

गोसीखुर्द धरणाच्या तांत्रिक दोषयुक्त वितरिकेमुळे शेतपिके पाण्याखाली !

शेतकर्‍यांची होणारी आर्थिक हानी कोण भरून काढणार ?

पुणे येथील तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद !

भ्रष्ट अधिकार्‍यांना कशाचाच धाक उरला नाही, हेच यावरुन सिद्ध होते. देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

राज्यातील १० जिल्ह्यांत २ सहस्र ८५२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर अंत्यविधी !

जालना जिल्ह्यात ९७१ ग्रामपंचायती आहेत, यांपैकी ६९५ गावांमध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर २७० गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी आणि दफनभूमी नाही. उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.

… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल.

राजूर घाटात (जिल्हा बुलढाणा) महिलेवर सामूहिक बलात्कार 

जिल्ह्यात मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटातून खडकीकडे चाललेल्या एका दांपत्याला ८ जणांच्या टोळक्याने अडवून त्यांच्याकडून ४५ सहस्र रुपये लुटले. तसेच पतीला मारहाण करून ३५ वर्षीय पत्नीवर चाकूचा धाक दाखवून ८ जणांनी बलात्कार केला.

श्री गणेश मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे.