सातारा येथील स्नेहल मांढरे हिला ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कार घोषित !

धनुर्विद्या खेळात उत्तुंग कामगिरी केल्याविषयी येथील स्नेहल विष्णु मांढरे हिला राज्यशासनाच्या वतीने वर्ष २०१९-२० या कालावधीतील ‘शिवछत्रपती’ हा राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोर (जिल्हा पुणे) येथे त्यांना अभिवादन !

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे, वीर शिवा काशीद आणि बांदल सेनेच्या ३६३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पावनखिंड (कोल्हापूर) ते भोर तालुक्यातील कसबे शिंद गाव असे २५० कि.मी. ज्योत आणून हे अभिवादन केले.

१९ ते २२ जुलै या काळात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

हवामान विभागाने १७ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला, तर १८ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता आहे. 

शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये अनुदान थकीत !

सातारा जिल्हा पुरवठा विभागाने सातारा जिल्हा परिषद उपाहारगृहातील शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये थकवले आहेत. या अनुदानासाठी उपाहारगृह व्यवस्थापकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे

अखिल भारत हिंदु महासभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार !

‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात १३ जुलैला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

पिंपरी (पुणे) येथील महापालिकेच्या जलतरण तलावांचे खासगीकरण नको ! – सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

जलतरण तलावांचे दर १० रुपयांवरून २० रुपये केले आहेत. मासिक परवान्याचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे महापालिकेला दुप्पट उत्पन्न मिळत आहे. तरीही महापालिकेच्या वतीने जलतरणांचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

जेजुरी (पुणे) येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम मंत्री येणार नसल्याने रहित झाल्यामुळे प्रशासनाचे २ कोटी रुपये वाया !

३ वेळा कार्यक्रमाचा दिनांक पालटूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहू न शकल्याने पुरंदर जिल्ह्यातील जेजुरी येथे १३ जुलै या दिवशीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

चातुर्मासाच्या निमित्ताने श्री सांस्कृतिक भवन येथे आज कलश स्थापना ! – विजय पाटील, प्रतिमा विद्या प्रतिष्ठान

१६ जुलैला श्री सांस्कृतिक भवन, आर्.के.नगर येथे दुपारी १ वाजता चातुर्मास कलश स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘प्रतिमा विद्या प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !

मनसेच्या पाठपुराव्यानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी ट्रस्टला वन विभागाची ८ दिवसांची समयमर्यादा !

वन विभाग झोपा काढत असल्यामुळेच सरकारजी जागांवर अशा प्रकारे अतिक्रमण होते. त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासह ते होण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा !