वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश !
सांगली, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर वन विभागाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे विशाळगडाचे पावित्र्य नष्ट होत असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, असा आदेश वन विभागाला राज्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये दिला.
१. विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयामध्ये वनमंत्री श्री. गणेश नाईक यांची भेट घेत विशाळगडावरील वन विभागाच्या भूमीवरील अतिक्रमणे काढण्याच्या संदर्भात आदेश देण्याची आग्रही मागणी केली.
२. या मागणीनंतर वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकार्यांची बैठक झाल्यावर मंत्री श्री. गणेश नाईक यांनी हे आदेश दिले.
|