श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘काही दिवसांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञांनी अवकाशात चंद्रावर एक यान सोडले होते; परंतु काही तांत्रिक अडचणी आल्याने ‘ते यान निर्धारित ठिकाणी चांगल्या स्थितीत पोचले कि नाही ?’, हे कळू शकले नाही; कारण पृथ्वीवरून आपल्या शास्त्रज्ञांचा यानाशी असलेला संपर्क अकस्मात् तुटला होता. ‘त्याला काय अडचण आली होती ?’, हे पुष्कळ दिवस कोणालाच कळू शकले नव्हते.
१. त्या संदर्भात समाजातील एका व्यक्तीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना विचारलेला प्रश्न आणि त्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेले उत्तर
१ अ. प्रश्न : त्या वेळी समाजातील एका व्यक्तीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना विचारले, ‘‘तुम्हाला सूक्ष्मातील गोष्टी कळतात, तर तुम्ही या यानाविषयी सूक्ष्मातून माहिती काढू शकता का ? तुमच्या साधनाशक्तीने तुम्ही सूक्ष्मातून या यानाशी संपर्क करू शकता का ?’’
१ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेले उत्तर
१ आ १. जे प्रश्न विज्ञानाने सुटू शकतात, त्यासाठी आपली साधनेची ऊर्जा व्यय करणे अयोग्य आहे आणि पृथ्वीवरील वातावरण सकारात्मक होऊ लागल्यास त्या यानाला प्रवास करण्यासाठी वातावरणातून कोणताच अडथळा होणार नाही : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना सांगितले, ‘‘जे प्रश्न विज्ञानाने सुटू शकतात, त्यासाठी आपली साधनेची ऊर्जा व्यय करणे अयोग्य आहे. आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी केलेला हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे; पण सध्याच्या काळाची आपत्कालीन स्थिती पहाता राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती बिकट आहे. तिसरे महायुद्ध होण्याच्या आत लोकांना धर्मशिक्षण देण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचून त्यांना साधना सांगण्यासाठी आपला वेळ अधिकाधिक दिला पाहिजे. धर्मप्रसार कार्यात विघ्ने आणणार्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढण्यासाठी आपल्या साधनेची शक्ती पणाला लावली पाहिजे. गुरु आणि देव आपल्या पाठीशी आहेतच. पुढे देव आणि गुरु यांच्या दैवी ऊर्जेच्या पाठबळावर पृथ्वीवरील वातावरणच सकारात्मक होऊ लागेल. पुढे सोडले जाणारे यान यशस्वीपणे त्या त्या ग्रहावर उतरेल; कारण या यानाला प्रवास करण्यासाठी वातावरणातून कोणताच अडथळा होणार नाही. त्याला वातावरणातील दैवी ऊर्जाच आध्यात्मिक बळ पुरवेल. पुढे सगळ्याच वैज्ञानिक गोष्टी आपल्याला सोप्या होतील. त्यासाठी आपली साधना पृथ्वीवरील रज-तम नष्ट करून वातावरण सत्त्वगुणी होण्यासाठी व्यय केली पाहिजे. सर्व पृथ्वीच शुद्ध झाली, तर या वातावरणात केलेला प्रत्येक वैज्ञानिक प्रयोग १०० टक्के यशस्वी झाल्याविना रहाणार नाही.’’
१ आ २. शास्त्रज्ञांनी साधना केल्यास त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला देवाचा आशीर्वाद लाभेल आणि देवाला काहीही अशक्य नाही : प्रथम आपल्याला उत्तम समाजव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली ऊर्जा व्यय केली पाहिजे. प्रत्येक मनुष्य धर्माचरणी आणि सात्त्विक झाला, तर तो करत असलेल्या कर्मातून सात्त्विक स्पंदने वातावरणात पसरतील आणि वातावरण शुद्ध होण्यास साहाय्य होईल. परग्रहांवर यान पाठवण्याच्या कार्यात सहभागी असणार्या शास्त्रज्ञांनीही स्वतः साधना केली, तर त्यांच्या प्रत्येक प्रयोगाला देवाचा आशीर्वाद लाभल्याविना रहाणार नाही. यान सोडतांना केवळ मानवी बळ किंवा वैज्ञानिक बळ वापरून चालणार नाही, तर त्यासाठी देवाच्या आशीर्वादाचे आध्यात्मिक बळही हवे. त्यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी साधनेचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी प्रत्येक शास्त्रीय प्रयोग देवाला स्मरून केला पाहिजे. ज्या देवाने संपूर्ण ग्रहगोलांची गती, ब्रह्मांडाची गती आणि अनंत प्रकारची ब्रह्मांडे निर्माण केली, त्या परमेश्वराला काय अशक्य आहे ? त्याला एका पृथ्वीवरून सोडलेल्या यानाची गती नियंत्रित करणे अवघड आहे का ? ‘आपण त्याचे साहाय्य घेत नाही’, ही आपली त्रुटी आहे. आपण पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला साधना करण्यास प्रवृत्त केले, तर आपल्या प्रत्येक प्रयत्नात यश आल्याविना राहणार नाही.
१ आ ३. मायेतील व्यावहारिक गोष्टींसाठी आपली ऊर्जा व्यय करण्यापेक्षा काळाच्या आवश्यकतेनुसार प्रार्थना आणि प्रयत्न केल्यास भगवंताची कृपा संपादन करता येईल.
१ आ ४. कोरड्या विज्ञानाने अंतराळाचा शोध घेण्यात अनेक जन्म वाया जातात; म्हणून ‘आपण ग्रहांचीच निर्मिती करणार्या आणि अंतराळातच वास्तव्य करणार्या ईश्वरालाच प्रसन्न करून घेतले, तर आपण ब्रह्मांड पोकळीवरही विजय मिळवू शकतो’, यात शंका नाही.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|