अल्वी याने कावड यात्रेकरूंना ठार मारण्याचे आवाहन केल्यानंतर चालू झाली होती दगडफेक !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील वनखंडी मंदिराच्या आधी एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्मान अल्वी, मशिदीचा मौलाना (इस्लामचा अभ्यासक) आणि त्याचा मुलगा, सलीम शाह, छोटे शाह, मम्मा ढोल, राशिद मुखबिर, वाहिद, चांद महंमद, गुड्डू, सरदार शाह, भूरा आदी १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यांतील उस्मान अल्वी याला पोलिसांनी अटक केली आहे. तो येथील माजी नगरसेवक आहे. या दगडफेकीत महिलांसह काही कावड यात्रेकरू घायाळ झाले होते. विशेष म्हणजे ही घटना घडली, तेव्हा पोलीस येथे उपस्थित होते.
(सौजन्य : दस्तक टाईम्स)
कावड यात्रेकरूंनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मशिदीजवळून जात असतांना उस्मान अल्वी याने मोठ्या आवाजात ‘या लोकांना ठार मारा’, असे चिथावणीखोर विधान केले. यानंतर मशिदीच्या छतावरून दगडफेक करण्यात आली.
कांवड़ियों से इतनी नफरत।
मस्जिद से कांवड़ियों पर कट्टरपंथी मुसलमानों ने किया पथराव।
2000 कांवड़ियों का जत्था जल लेने जा रहा था तभी फेंके गए पत्थर।
मामला उत्तर प्रदेश के बरेली का। pic.twitter.com/P0vrAf0WXd
— Panchjanya (@epanchjanya) July 23, 2023
गुलाल उडाल्याने मुसलमानांकडून दगडफेक !
मुसलमानांनी दावा केला आहे की, कावड यात्रेकरूंच्या मिरवणुकीमध्ये चित्ररथ होता आणि तेथे गुलाल उधळण्यात येत होता. तेथे एक पंखा होता. चित्ररथ मशिदीजवळ आल्यानंतर पंख्याची दिशा तिच्याकडे करण्यात आली. त्यामुळे पंख्याच्या हवेमुळे गुलाल मशिदीजवळ उभ्या असणार्या लोकांवर तो उडाला आणि वाद होऊन दगडफेक झाली. (केवळ गुलाल उडाल्याने हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण केले जाते; मात्र दिवसांतून ५ वेळा मशिदींतून ‘अल्लापेक्षा कुणीही महान नाही’ अशा प्रकारचे कर्णकर्कश आवाजात सांगण्यात येते त्याविषयी अन्य धर्मीय मौन रहातात, हे निधर्मीवादी कधी लक्षात घेतील का ?- संपादक)
संपादकीय भूमिका
|
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)