
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात बोलत असतांना ‘निसर्ग स्तब्ध होऊन सर्व जण त्यांची दैवी वाणी ऐकण्यात तल्लीन होतात’, असे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात बोलत असतांना वातावरणात पालट होतो. सर्व सृष्टी शांत होते. लता, वेली आणि निसर्गही स्तब्ध होतो. त्या वेळी वाराही शांत होतो अन् पशू-पक्षीही त्यांची दैवी वाणी शांतपणे ऐकतात. सर्व जण त्यांची वाणी ऐकण्यात तल्लीन होतात. साधकांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तीही साधकांना त्रास द्यायचे विसरून जातात आणि त्याही तल्लीन होऊन दैवी वाणी ऐकतात’, असे मला जाणवते.
२. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे प्रत्यक्षात देवीचे चालते-बोलते मूर्तीमंत रूप आहे’, असे वाटणे आणि त्यांच्या वाणीतून दैवी ऊर्जा मिळणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे बोलणे ऐकतांना मला स्वतःचा विसर पडतो. भाववृद्धी सत्संग झाल्यावरही मी त्याच भावविश्वात हरवून जाते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीत पुष्कळ चैतन्य आहे. ‘भावसत्संग ऐकतांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, म्हणजे ‘साक्षात् शिवाची प्रीतीस्वरूप पार्वतीमाता आहे. त्या श्रीरामाच्या भक्तवत्सल, करुणामय सीतामाता आहेत. त्या भक्तांच्या हाकेला धावून येणारी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी, अज्ञान दूर करून ज्ञान प्रदान करणारी, संकटनिवारण करणारी श्रीविष्णूची लक्ष्मीमाता आहे’, असे मला जाणवते. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणजे प्रत्यक्षात देवीचे चालते-बोलते मूर्तीमंत रूप आहे’, असे मला वाटते. या घनघोर आपत्काळात आम्हाला साक्षात् देवीचे दर्शन होत आहे आणि तिची चैतन्यमय वाणी ऐकायला मिळत आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे प्रत्येक वाक्य आमच्या अंतर्मनात जाते आणि त्यातून आम्हाला दैवी ऊर्जा मिळते.
श्रीविष्णुरूपी गुरूंच्या कृपेनेच मला हे सर्व अनुभवता आले आणि त्यांनीच हे माझ्याकडून लिहून घेतले. त्यासाठी मी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२५.२.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !