
‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’ सध्या कोरोना या जागतिक महामारीमुळे लोकांचे अतिशय हाल होत आहेत आणि किडामुंगीप्रमाणे लोक मरत आहेत. अशा भीषण काळातच विविध ठिकाणच्या संतांनी देहत्याग केल्याची वृत्तेही येत आहेत. गेल्या ८ दिवसांत देहत्याग केलेल्या संतांची नावे पुढे सारणीत दिली आहेत.
संतांना आपत्काळात सूक्ष्मातून अधिक कार्य करता येते; म्हणून काळाची आवश्यकता ओळखून ते देहत्याग करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या आपत्काळाची ही नांदीच आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्काळाला तोंड देण्यासाठी सनातन संस्थेचे साधक समाजात जाऊन साधना करण्याविषयी जगभरातील जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करत आहे. ‘साधना केली, तरच आपण या आपत्काळात तरून जाणार आहोत’, हे लक्षात घेऊन आतापासूनच साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करा.’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२१)

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !