
‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’ सध्या कोरोना या जागतिक महामारीमुळे लोकांचे अतिशय हाल होत आहेत आणि किडामुंगीप्रमाणे लोक मरत आहेत. अशा भीषण काळातच विविध ठिकाणच्या संतांनी देहत्याग केल्याची वृत्तेही येत आहेत. गेल्या ८ दिवसांत देहत्याग केलेल्या संतांची नावे पुढे सारणीत दिली आहेत.
संतांना आपत्काळात सूक्ष्मातून अधिक कार्य करता येते; म्हणून काळाची आवश्यकता ओळखून ते देहत्याग करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या आपत्काळाची ही नांदीच आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्काळाला तोंड देण्यासाठी सनातन संस्थेचे साधक समाजात जाऊन साधना करण्याविषयी जगभरातील जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करत आहे. ‘साधना केली, तरच आपण या आपत्काळात तरून जाणार आहोत’, हे लक्षात घेऊन आतापासूनच साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करा.’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२१)

श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था