राज्यात २४ घंट्यांत २ सहस्र ८०४ कोरोनाबाधित, तर ५० रुग्णांचा मृत्यू

पणजी – राज्यात १० मे या दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र ८०४ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनाचा संसर्ग झाल्याने ५० रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ६ सहस्र १०७ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४५.९१ टक्के आहे. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ३२ सहस्र २६२ झाली आहे. दिवसभरात २ सहस्र ३६७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १६५ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

राज्यातील ११ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात सर्वाधिक मडगाव येथे कोरोनाबाधित २ सहस्र ६८८ रुग्ण आहेत, तर त्यापाठोपाठ पणजी १ सहस्र ८६४, कांदोळी १ सहस्र ७४८, फोंडा १ सहस्र ७४५, म्हापसा १ सहस्र ६८०, पर्वरी १ सहस्र ५९६, सांखळी १ सहस्र ४०१, कुठ्ठाळी १ सहस्र २७१,  चिंबल १ सहस्र २०९, शिवोली १ सहस्र १२४ आणि वास्को १ सहस्र ४३, अशी आरोग्यकेंद्रागणिक रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत पणजी आरोग्यकेंद्र दुसर्‍या क्रमांकावर पोचले आहे.